Re: वलय (कादंबरी) Marathi latest 2020 sex story
Posted: 21 Jun 2020 15:55
वलय - प्रकरण १५
त्या दिवशी सुप्रिया सोबत "कॅपलर्स कॅफे" मध्ये बोलणे झाल्यावर राजेश रूमवर गेला, त्याने तयारी केली आणि स्टेशन वर आला.
मुंबईहून "स्वागतपुरी" गावाला जायला सात ते आठ तास लागतात. राजेश ट्रेनमधून गावातल्या स्टेशनवर उतरला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. मग रिक्षा करून तो घरी पोहोचला. त्याचे एक छोटेसे वडिलोपार्जीत दुमजली घर होते..
त्याचे वडील लहानपणीच वारले होते. मग त्याने आणि आईने मेहनत करून संसाराचा गाडा इथपर्यंत आणला होता.
दरवाज्यावर टकटक करताच त्याच्या आईने दार उघडले.
"आलास? बराच उशीर झाला. गाडी लेट झाली वाटतं", सुरकुत्यांच्या आडचा तिचा चेहरा आनंदून हसला.
"हो. कंटाळवाणा होता प्रवास!", राजेश म्हणाला
"हो ना. बैस. पाणी देते", आई त्याला म्हणाली.
राजेश पलंगावर बसला. छतावर पंखा वेगात फिरत होता. पाणी पिल्यावर मग तो फ्रेश झाला. जेवतांना इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. मग रात्री झोपण्याच्या वेळेस ट्यूब लाईट बंद करून पिवळा डीम लाईट लावण्यात आला. राजेश आणि त्याची आई झोपायला म्हणून आडवे झाले.
आई झोपेच्या अधीन झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते आणि राजेश मात्र जोरात फिरणाऱ्या छतावरच्या पंख्याकडे बघत होता. पंखा बिचारा अविरत फिरतच होता. डीम लाईट मुळे त्याची सावली बाजूच्या भिंतीवर पडली होती. त्याला फिरत्या पंख्यावर अधून मधून सुप्रिया ची प्रतिमा दिसत होती. त्याने तिला स्पष्ट नाही संगीतल्यावरचा तिचा निराश चेहरा सारखा पंख्याच्या पात्यांवर उमटत होता. त्याच्या मनात अनेक विचारांचे पाते असलेला पंखा फिरत होता.
"सुप्रियाला नाही म्हणून मी चूक केली का?
प्रवासात मला सारखी सुप्रिया का आठवत होती?
का मी इतका कठोर झालो?
होय, झालो!
माझी महत्वाकांक्षा मला प्रिय असल्याने मला सुप्रिया अप्रिय वाटली!
आणि ती पूर्ण होण्यासाठी मी काहीही करेन.....
आणि मी जे करणार आहे त्यात काय चूक आहे? काहीच नाही!
आता बऱ्यापैकी मी या इंडस्ट्रीत लेखक म्हणून स्थिरावलो आहे.
जरा पैसाही जमा झालाय. आता माझ्या मोहिमेस उद्यापासून सुरूवात करायला हरकत नाही!"
अजून झोप येत नव्हती. ती येईल असे त्याला वाटत नव्हते.
"मी कुठे लपलीय शोध?" असे म्हणून झोप लपून बसली होती पण एका क्षणी राजेशने तिच्याशी लपंडाव खेळणे शेवटी सोडून दिले. बेडवर उठून बाजूला ठेवलेल्या तांब्याच्या कळशीतून त्याने पाणी पिले.
मग रात्रीच्या बारा वाजेचा गजर घड्याळाने दिला आणि त्याला तो इयत्ता आठवीत असतानाचा अगदी असाच आवाज असणारा शाळेतल्या घड्याळाचा गजर आठवला….
.... त्या दिवशी दुपारचे बारा वाजले होते. राजेशने लिहिलेले स्वातंत्र्य लढ्यावर आधारित एक छानसे आणि छोटेसे एक नाटक त्याने श्रीयुत खारकातेकर या आर्ट आणि कल्चरच्या शिक्षकांना दिले.
ते शिक्षक आणि राजेश दोघे टीचर्स रुम मध्ये बसले होते. त्याने ते लिखाण त्यांना दिले तेव्हा तिथे इतर कुणी उपस्थित नव्हते.
"राजेश! मला आता लगेच वेळ नाही. पण मी आज रात्री घरी तुझे लिखाण वाचेन!"
राजेश तेथून निघाला आणि वर्गात जाऊन बसला.
त्याला या गोष्टीचे खूप अप्रूप वाटत होते की त्याने लिहिलेले नाटक त्याचे शिक्षक वाचणार!
तसे त्याने आतापर्यंत छोट्या मोठ्या बाल साहसकथा लिहिल्या होत्या. त्या मित्र मैत्रिणींना त्याने वाचूनही दाखवल्या होत्या. सगळ्यांना त्या कथा आवडायच्या. अगदी हौस म्हणून सहजच लिहिलेल्या कथा इतरांना भयंकर आवडून जायच्या. आता आठवड्यानंतर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथमच त्याचे नाटक स्टेजवर साकारणार होते, फक्त खारकाते सरांनी त्याची मान्यता दिली की झाले! या कल्पनेनेच तो एवढा उत्तेजीत झाला की त्याचे समोरच्या गणिताच्या शिक्षकांकडे लक्षच नव्हते. तो त्याच्या नाटकातले संवाद आठवत बसला होता.
"64 चे वर्गमूळ काय? तू सांग राजेश?" राजेश विचारांत गढला आहे बघून शिक्षकांनी विचारले. गणिताच्या त्या शिक्षकांचे नाव होते अंकब्रम्हे सर!!
"चले जाव! चले जाव!" अचानक दचकून त्याच्या तोंडातून अचानक बाहेर पडले आणि सगळा वर्ग हसायला लागला.
"अरे बाळा! काय झालंए तुला? एवढा हुशार मुलगा इतका उदंड कसा काय झाला बरे? तब्येत बरी आहे ना? स्वतः वर्गात लक्ष नाही आणि शिक्षकांना चले जाव म्हणतोस! तूच उठ आणि चले जाव! आणि व्हरांडे में खुद को मुर्गा बनाव!" शिक्षक म्हणाले आणि पूर्ण वर्ग आणखी दुपटीने खळाळून हसला.
"गप्प बसा रे! हसू नका!" शिक्षक गरजले.
भानावर आल्यावर चूक लक्षात आल्याने राजेश ओशाळला आणि म्हणाला, "माफ करा. मला तुम्हाला चले जाव म्हणायचे नव्हते. इंग्रजाना म्हणतो होतो मी: चले जाव.."
सगळा वर्ग आता काहीतरी आणखी गम्मत बघायला मिळेल आणि आणखी मनोरंजन होईल या हेतूने सरसावून बसला.
त्या दिवशी सुप्रिया सोबत "कॅपलर्स कॅफे" मध्ये बोलणे झाल्यावर राजेश रूमवर गेला, त्याने तयारी केली आणि स्टेशन वर आला.
मुंबईहून "स्वागतपुरी" गावाला जायला सात ते आठ तास लागतात. राजेश ट्रेनमधून गावातल्या स्टेशनवर उतरला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. मग रिक्षा करून तो घरी पोहोचला. त्याचे एक छोटेसे वडिलोपार्जीत दुमजली घर होते..
त्याचे वडील लहानपणीच वारले होते. मग त्याने आणि आईने मेहनत करून संसाराचा गाडा इथपर्यंत आणला होता.
दरवाज्यावर टकटक करताच त्याच्या आईने दार उघडले.
"आलास? बराच उशीर झाला. गाडी लेट झाली वाटतं", सुरकुत्यांच्या आडचा तिचा चेहरा आनंदून हसला.
"हो. कंटाळवाणा होता प्रवास!", राजेश म्हणाला
"हो ना. बैस. पाणी देते", आई त्याला म्हणाली.
राजेश पलंगावर बसला. छतावर पंखा वेगात फिरत होता. पाणी पिल्यावर मग तो फ्रेश झाला. जेवतांना इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. मग रात्री झोपण्याच्या वेळेस ट्यूब लाईट बंद करून पिवळा डीम लाईट लावण्यात आला. राजेश आणि त्याची आई झोपायला म्हणून आडवे झाले.
आई झोपेच्या अधीन झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते आणि राजेश मात्र जोरात फिरणाऱ्या छतावरच्या पंख्याकडे बघत होता. पंखा बिचारा अविरत फिरतच होता. डीम लाईट मुळे त्याची सावली बाजूच्या भिंतीवर पडली होती. त्याला फिरत्या पंख्यावर अधून मधून सुप्रिया ची प्रतिमा दिसत होती. त्याने तिला स्पष्ट नाही संगीतल्यावरचा तिचा निराश चेहरा सारखा पंख्याच्या पात्यांवर उमटत होता. त्याच्या मनात अनेक विचारांचे पाते असलेला पंखा फिरत होता.
"सुप्रियाला नाही म्हणून मी चूक केली का?
प्रवासात मला सारखी सुप्रिया का आठवत होती?
का मी इतका कठोर झालो?
होय, झालो!
माझी महत्वाकांक्षा मला प्रिय असल्याने मला सुप्रिया अप्रिय वाटली!
आणि ती पूर्ण होण्यासाठी मी काहीही करेन.....
आणि मी जे करणार आहे त्यात काय चूक आहे? काहीच नाही!
आता बऱ्यापैकी मी या इंडस्ट्रीत लेखक म्हणून स्थिरावलो आहे.
जरा पैसाही जमा झालाय. आता माझ्या मोहिमेस उद्यापासून सुरूवात करायला हरकत नाही!"
अजून झोप येत नव्हती. ती येईल असे त्याला वाटत नव्हते.
"मी कुठे लपलीय शोध?" असे म्हणून झोप लपून बसली होती पण एका क्षणी राजेशने तिच्याशी लपंडाव खेळणे शेवटी सोडून दिले. बेडवर उठून बाजूला ठेवलेल्या तांब्याच्या कळशीतून त्याने पाणी पिले.
मग रात्रीच्या बारा वाजेचा गजर घड्याळाने दिला आणि त्याला तो इयत्ता आठवीत असतानाचा अगदी असाच आवाज असणारा शाळेतल्या घड्याळाचा गजर आठवला….
.... त्या दिवशी दुपारचे बारा वाजले होते. राजेशने लिहिलेले स्वातंत्र्य लढ्यावर आधारित एक छानसे आणि छोटेसे एक नाटक त्याने श्रीयुत खारकातेकर या आर्ट आणि कल्चरच्या शिक्षकांना दिले.
ते शिक्षक आणि राजेश दोघे टीचर्स रुम मध्ये बसले होते. त्याने ते लिखाण त्यांना दिले तेव्हा तिथे इतर कुणी उपस्थित नव्हते.
"राजेश! मला आता लगेच वेळ नाही. पण मी आज रात्री घरी तुझे लिखाण वाचेन!"
राजेश तेथून निघाला आणि वर्गात जाऊन बसला.
त्याला या गोष्टीचे खूप अप्रूप वाटत होते की त्याने लिहिलेले नाटक त्याचे शिक्षक वाचणार!
तसे त्याने आतापर्यंत छोट्या मोठ्या बाल साहसकथा लिहिल्या होत्या. त्या मित्र मैत्रिणींना त्याने वाचूनही दाखवल्या होत्या. सगळ्यांना त्या कथा आवडायच्या. अगदी हौस म्हणून सहजच लिहिलेल्या कथा इतरांना भयंकर आवडून जायच्या. आता आठवड्यानंतर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथमच त्याचे नाटक स्टेजवर साकारणार होते, फक्त खारकाते सरांनी त्याची मान्यता दिली की झाले! या कल्पनेनेच तो एवढा उत्तेजीत झाला की त्याचे समोरच्या गणिताच्या शिक्षकांकडे लक्षच नव्हते. तो त्याच्या नाटकातले संवाद आठवत बसला होता.
"64 चे वर्गमूळ काय? तू सांग राजेश?" राजेश विचारांत गढला आहे बघून शिक्षकांनी विचारले. गणिताच्या त्या शिक्षकांचे नाव होते अंकब्रम्हे सर!!
"चले जाव! चले जाव!" अचानक दचकून त्याच्या तोंडातून अचानक बाहेर पडले आणि सगळा वर्ग हसायला लागला.
"अरे बाळा! काय झालंए तुला? एवढा हुशार मुलगा इतका उदंड कसा काय झाला बरे? तब्येत बरी आहे ना? स्वतः वर्गात लक्ष नाही आणि शिक्षकांना चले जाव म्हणतोस! तूच उठ आणि चले जाव! आणि व्हरांडे में खुद को मुर्गा बनाव!" शिक्षक म्हणाले आणि पूर्ण वर्ग आणखी दुपटीने खळाळून हसला.
"गप्प बसा रे! हसू नका!" शिक्षक गरजले.
भानावर आल्यावर चूक लक्षात आल्याने राजेश ओशाळला आणि म्हणाला, "माफ करा. मला तुम्हाला चले जाव म्हणायचे नव्हते. इंग्रजाना म्हणतो होतो मी: चले जाव.."
सगळा वर्ग आता काहीतरी आणखी गम्मत बघायला मिळेल आणि आणखी मनोरंजन होईल या हेतूने सरसावून बसला.